" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*==========================मेढा :

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*
==========================
मेढा :22/9/2023
" महाविद्यालयाच्या जडण घडणीत माजी विद्यार्थी मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची असून,माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण या विध्यार्थ्यांचे योगदान हे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अंत्यत महत्वाचे असते " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांनी केले.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थी मंडळाच्या वतीने, महाविद्यालयात विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.त्या प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक गिरी आपल्या अध्यक्षीय भाषणावेळी बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.गिरी सर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, " महाविद्यालयातून विशेष प्राविण्य प्राप्त करून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या,तसेच उच्च पदावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यानी, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करावे आणि आपल्या महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा "असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सदर मेळाव्यास संबोधित करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात  राबविले जात असलेले विविध उपक्रम आणि उपलब्ध भौतिक सुविधा याबाबात माहिती दिली. नजिकच्या काळात महाविद्यालयाचे नॅक समिती  कडून मूल्यांकन होणार असल्याने   माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध रुपात आपले विशेष योगदान द्यावे असे यावेळी आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा व त्यांच्याकडील विविध कौशल्यांचा  फायदा भावी पिढीतील विध्यार्थ्यांना व्हावा, तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण विकासामध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळावे या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यामध्ये नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांनी नॅक मूल्यांकनला माजी विध्यार्थी मंडळ सदस्यांनी कसे सामोरे जावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष ॲड. श्री.अनुप लकडे, उपाध्यक्ष श्री. सुर्यकांत पवार, सलीम डांगे, शुभम लोखंडे,प्रशांत लिंगडे या विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ. संजय धोंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. आनंद साठे यांनी सूत्रसंचालन केले.  मेळाव्यास ५० हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी प्रा.शंकर गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश