Thursday, 31 March 2022

जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढ्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक 24 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या कालावधीमध्ये "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत" या ब्रीदवाक्यासह मौजे वरोशी ता. जावली जिल्हा सातारा येथे संपन्न झाले आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. तेजसदादा शिंदे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जयवंत प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. श्री. दादासाहेब शिंदे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना मा. तेजस दादा शिंदे म्हणाले की विद्यार्थी दशेत होणारे संस्कार आयुष्यभर साथ देतात, प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी ही उद्याचे सुजाण नागरिक आहेत. असे शिबीर युवकांना योग्य दिशा देण्यात मोलाची मदत करतात. या शिबिरामधून शारीरिक श्रमसंस्कारांच्या सोबत जीवनमूल्ये आणि बौद्धिक संस्कार विद्यार्थी सोबत घेऊन निघाले आहेत. समाजाच्या प्रति आपल्या देशाच्या प्रति आपली जबाबदारी अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी पार पाडत आहेत जे स्पृहणीय आहे. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी तसेच विवेकी विचारांच्या जपणूकीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. दादासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कारांचे महत्त्व समजावून सांगितले. ही संस्कार शिदोरी पाठीशी असेल तर जगातील कुठलीही गोष्ट अवघड नाही असे मत त्यांनी मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. शिबिरात सात दिवसांत नव्याने शिकलेल्या गोष्टी, चांगल्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर विद्यार्थ्यांचे  व्यक्तिमत्त्व उत्तम घडेल असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी, महिला मेळावा, रस्ते दुरुस्ती, गटार स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, पाणपोई स्वच्छता, तसेच विविध विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम सात दिवसांच्या कालावधीत उत्तम रित्या पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ संजय भोसले यांनी केलेआभार प्रदर्शन धनश्री देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन गायत्री जाधव यांनी केले समारोप समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ प्रमोद घाटगे, गोरखनाथ नलवडे, विकास अवघडे, सत्यजित चावरे, उपसरपंच संदीप कासुर्डे, वरोशी ग्रामस्थ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढ्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक 24 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या कालावधीमध्ये "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत" या ब्रीदवाक्यासह मौजे वरोशी ता. जावली जिल्हा सातारा येथे संपन्न झाले 
आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. तेजसदादा शिंदे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जयवंत प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. श्री. दादासाहेब शिंदे हे होते. 
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना मा. तेजस दादा शिंदे म्हणाले की विद्यार्थी दशेत होणारे संस्कार आयुष्यभर साथ देतात, प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी ही उद्याचे सुजाण नागरिक आहेत. असे शिबीर युवकांना योग्य दिशा देण्यात मोलाची मदत करतात. या शिबिरामधून शारीरिक श्रमसंस्कारांच्या सोबत जीवनमूल्ये आणि बौद्धिक संस्कार विद्यार्थी सोबत घेऊन निघाले आहेत. समाजाच्या प्रति आपल्या देशाच्या प्रति आपली जबाबदारी अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी पार पाडत आहेत जे स्पृहणीय आहे. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी तसेच विवेकी विचारांच्या जपणूकीसाठी शुभेच्छा दिल्या. 
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. दादासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कारांचे महत्त्व समजावून सांगितले. ही संस्कार शिदोरी पाठीशी असेल तर जगातील कुठलीही गोष्ट अवघड नाही असे मत त्यांनी मांडले. 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. शिबिरात सात दिवसांत नव्याने शिकलेल्या गोष्टी, चांगल्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर विद्यार्थ्यांचे  व्यक्तिमत्त्व उत्तम घडेल असे मत त्यांनी व्यक्त केले. 
सदर शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी, महिला मेळावा, रस्ते दुरुस्ती, गटार स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, पाणपोई स्वच्छता, तसेच विविध विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम सात दिवसांच्या कालावधीत उत्तम रित्या पार पडले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ संजय भोसले यांनी केले
आभार प्रदर्शन धनश्री देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन गायत्री जाधव यांनी केले 
समारोप समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ प्रमोद घाटगे, गोरखनाथ नलवडे, विकास अवघडे, सत्यजित चावरे, उपसरपंच संदीप कासुर्डे, वरोशी ग्रामस्थ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Friday, 25 March 2022

NSS ACTIVITY 2022

केळघर : सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे आजची युवापिढी इंटरनेटच्या जाळ्यात ओढली जात आहे. मात्र आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार, कष्ट करण्याची तयारी व कठोर परिश्रम यामुळे सामान्य कुटुंबातील अगदी छोट्याशा खेड्यातील युवक देखील आज उच्च पदस्थ अधिकारी होत आहेत. त्यामुळे युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे याबरोबरच आपले संस्कार कायम आपल्या सोबत ठेवावेत,निश्चित यशाला गवसणी घालता येईल असा विश्वास तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केला.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वरोशी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयडीबीआयचे सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक विजयराव मोकाशी,आमदार शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, वरोशी चे सरपंच विलास शिर्के, उपसरपंच संदीप कासुर्डे, ग्रामसेवक एन. के. जाधव, माजी सरपंच सुरेश कासुर्डे, केशव कासुर्डे, आतिष कदम आदींची उपस्थिती होती.
तहसीलदार पोळ म्हणाले, जावळी तालुक्यासारख्या दुर्गम व डोंगराळ विभागात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने गुणवत्तेची एक परंपरा निर्माण केली आहे. विद्यार्थानी श्रमाची लाज न बाळगता आहे त्या परिस्थितीवर मात करून यशस्वी व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी. शिंदे महाविद्यालयाच्या या श्रमसंस्कार शिबिरामुळे वरोशी गावात चांगली कामे होतील. श्री. मोकाशी यांनीही आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. घाटगे यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सात दिवस वरोशी येथे स्त्री आरोग्य ,पाणपोई स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वृक्ष संवर्धन, गटार स्वछता ,प्लास्टिक निर्मूलन , श्रमदान , सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. उदय पवार यांनी आभार मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
केळघर : सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे आजची युवापिढी इंटरनेटच्या जाळ्यात ओढली जात आहे. मात्र आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार, कष्ट करण्याची तयारी व कठोर परिश्रम यामुळे सामान्य कुटुंबातील अगदी छोट्याशा खेड्यातील युवक देखील आज उच्च पदस्थ अधिकारी होत आहेत. त्यामुळे युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे याबरोबरच आपले संस्कार कायम आपल्या सोबत ठेवावेत,निश्चित यशाला गवसणी घालता येईल असा विश्वास तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केला.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वरोशी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयडीबीआयचे सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक विजयराव मोकाशी,आमदार शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, वरोशी चे सरपंच विलास शिर्के, उपसरपंच संदीप कासुर्डे, ग्रामसेवक एन. के. जाधव, माजी सरपंच सुरेश कासुर्डे, केशव कासुर्डे, आतिष कदम आदींची उपस्थिती होती.
तहसीलदार पोळ म्हणाले, जावळी तालुक्यासारख्या दुर्गम व डोंगराळ विभागात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने गुणवत्तेची एक परंपरा निर्माण केली आहे. विद्यार्थानी श्रमाची लाज न बाळगता आहे त्या परिस्थितीवर मात करून यशस्वी व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी. शिंदे महाविद्यालयाच्या या श्रमसंस्कार शिबिरामुळे वरोशी गावात चांगली कामे होतील. श्री. मोकाशी यांनीही आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. घाटगे यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सात दिवस वरोशी येथे स्त्री आरोग्य ,पाणपोई स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वृक्ष संवर्धन, गटार स्वछता ,प्लास्टिक निर्मूलन , श्रमदान , सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. उदय पवार यांनी आभार मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Sunday, 13 March 2022

inspirational

https://www.facebook.com/groups/worldmaratha/permalink/5139668229460653/

Thursday, 10 March 2022

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी....

या एकोणिसाव्या शतकात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रमुख भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.

त्या काळातील काही साक्षर स्त्रियान मध्ये गणल्या जाणार्‍या, सावित्रीबाईंना त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समवेत भिडे वाड्यात पुण्या तील मुलींची पहिली शाळा स्थापन करण्याचे श्रेय जाते. 

सावित्रीबाई फुले यांनी बाल विधवांना शिक्षित आणि सशक्त करण्यासाठी खूप मेहनत घेतली, बाल विवाह आणि सती प्रथा यांच्या विरोधात मोहीम चालवली आणि विधवा पुन र्विवाहाचा पुरस्कार केला. 

महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्ती, बी.आर. आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या सारख्या दलित जातीचे प्रतीक मानले जाते. 

सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यते विरुद्ध मोहीम चालवली आणि जात आणि लिंग- आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी सक्रिय पणे काम केले.

जन्म तारीख: 3 जानेवारी, 1831

  • जन्म ठिकाण: नायगाव (सध्याचा सातारा जिल्हा), ब्रिटिश भारत. 
  • मृत्यू: 10 मार्च 1897
  • मृत्यूचे ठिकाण: पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
  • पती चे नाव: महात्मा ज्योतिबा फुले

संस्था

  1. बालहत्या प्रतिबंधक गृह, 
  2. सत्यशोधक समाज, 
  3. महिला सेवा मंडळ

चळवळ: 

  1. महिला शिक्षण आणि सक्षमीकरण, सामाजिक सुधारणा चळवळ

सावित्रीबाई फुले यांचा परिचय (Introduction of Savitribai Phule in Marathi):-


सावित्रीबाई ज्योतिराव फुले (Savitribai Jyotirao Phule in Marathi) 


या एकोणिसाव्या शतकात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रमुख भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.

त्या काळातील काही साक्षर स्त्रियान मध्ये गणल्या जाणार्‍या, सावित्रीबाईंना त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समवेत भिडे वाड्यात पुण्या तील मुलींची पहिली शाळा स्थापन करण्याचे श्रेय जाते. 

सावित्रीबाई फुले यांनी बाल विधवांना शिक्षित आणि सशक्त करण्यासाठी खूप मेहनत घेतली, बाल विवाह आणि सती प्रथा यांच्या विरोधात मोहीम चालवली आणि विधवा पुन र्विवाहाचा पुरस्कार केला. 

महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्ती, बी.आर. आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या सारख्या दलित जातीचे प्रतीक मानले जाते. 

सावित्रीबाई फुले यांचे प्रारंभिक जीवन (Early life of Savitribai Phule in Marathi):-


सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी ब्रिटीश भारतातील नायगाव (सध्याचा सातारा जिल्हा) येथे एका शेतकरी कुटुंबात खंडोजी नेवेशे पाटील आणि लक्ष्मी या त्यांच्या थोरल्या मुलीच्या पोटी झाला. 

त्या काळातील मुलींची लग्ने लवकर होत असत, त्या मुळे प्रचलित रिती रिवाजां नुसार नऊ वर्षांच्या सावित्रीबाईंचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 मध्ये झाला. ज्योतिराव फुले पुढे गाढे विचारवंत, मोठे लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि जाति विरोधी समाज सुधारक बनले. 

महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील अग्रगण्य व्यक्तीन मध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांची गणना होते. सावित्रीबाईंचे शिक्षण लग्ना नंतर सुरू झाले. ज्योतिराव यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई यांना लिहायला आणि वाचायला शिकवले. 

सावित्रीबाई यांची शिकण्याची तळमळ पाहिल्या नंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना एका सामान्य शाळे मधून तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. या मुळे सावित्रीबाई यांच्या मनात शिकवण्याची आवड निर्माण झाली. 

या नंतर सावित्रीबाईंनी अहमदनगर येथील मिस फरार संस्थेत (Ms Farar’s Institution) प्रशिक्षण घेतले. ज्योतिराव सावित्रीबाईंच्या सर्व शैक्षणिक कार्यात त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील्या.


सावित्रीबाई फुले यांची महिला शिक्षण आणि सक्षमीकरणातील भूमिका (Role of Savitribai Phule in Women Education and Empowerment in Marathi):-


पुण्या मध्ये  (त्या वेळी पूना) मुलींसाठी पहिली स्वदेशी चालवली जाणारी शाळा 1848 मध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती जेव्हा सावित्रीबाई किशोर वयात होत्या.

या कारणासाठी कुटुंब आणि समाज दोघांनी ही त्यांना बहिष्कृत केले होते. असे असले तरी, दृढ निश्चयी जोडप्याला मित्र उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख यांनी आश्रय दिला, त्यांनी फुले दाम्पत्याला शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्या आवारात जागा दिली. 

सावित्रीबाई या शाळेच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी नंतर अस्पृश्य मानल्या गेलेल्या मांग आणि महार जातीं मधील मुलांसाठी शाळा सुरू केल्या. 

1852 मध्ये सावित्रीबाई यांनी शाळा सुरू केली. त्याच वर्षी 16 नोव्हेंबर रोजी ब्रिटिश सरकारने शिक्षण क्षेत्रातील योगदाना बद्दल फुले कुटुंबाचा गौरव केला, तर सावित्रीबाईंना उत्कृष्ट शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले. 

त्याच वर्षी त्यांनी महिलांना त्यांचे हक्क, सन्मान आणि इतर सामाजिक समस्यां बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला सेवा मंडळ सुरू केले. 

विधवांचे मुंडण करण्याच्या प्रचलित प्रथेला विरोध करण्यासाठी मुंबई आणि पुण्यात नाई संपाचे आयोजन करण्यात सावित्रीबाई फुले या यशस्वी झाली.

पण फुले दांपत्यांनी चालवलेल्या तीनही शाळा 1858 पर्यंत बंद झाल्या. या मागे प्रमुख करणे - 1857 च्या भारतीय सैन्याच्या बंडा नंतर खाजगी युरोपियन देणग्या कमी मिळणे, अभ्यासक्रमा वरील मतभेदा मुळे ज्योतिरावांनी शाळा व्यवस्थापन समितीचा राजीनामा देणे या सह अनेक कारणे होती. 

परिस्थिती मुळे खचून न जाता जोतिराव आणि सावित्रीबाईंनी फातिमा शेख यांच्या सह अत्याचारित समाजातील लोकांनाही शिक्षण देण्याची जबाबदारी हाती घेतली. आणि गेल्या काही वर्षांत, सावित्रीबाईंनी 18 शाळा उघडल्या आणि विविध जातीतील मुला -मुलींना शिकवले. 

सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी महिलांना तसेच इतर दलित जाती मधील मागास लोकांना शिकवायला सुरुवात केली. दलितांच्या शिक्षणाच्या विरोधात असलेल्या पुण्यातील उच्च वर्णीयांनी ही गोष्ट पटली नाही. परिणामी, सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांना स्थानिकां कडून धमकावण्यात आले आणि त्यांचा सामाजिक छळ आणि अपमानही करण्यात आला. 

शाळे कडे जाताना सावित्रीबाईं वर शेण, माती आणि दगड फेकण्यात आले. तथापि, असे दगड धोंड्याचे अत्याचार सावित्रीबाईंना त्यांच्या ध्येया पासून किंचित हि परावृत्त करू शकले नाहीत.

सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांना नंतर सगुणाबाईंनी सामील केले आणि त्याही कालांतराने शिक्षण चळवळीत आघाडी वर झाल्या. 

दरम्यान, फुले दाम्पत्याने 1855 मध्ये शेतकरी आणि मजुरांसाठी एक रात्र शाळा देखील उघडली जेणे करून ते दिवसा काम करू शकतील आणि रात्री शाळेत जाऊ शकतील.

शाळा गळतीचे प्रमाण (school dropout rate) तपासण्या साठी सावित्रीबाईंनी मुला- मुलींना शाळेत जाण्यासाठी स्टाय पेंड देण्याची प्रथा सुरू केली. सावित्रीबाई यांनी विद्यार्थ्यांना लेखन आणि चित्रकला या सारखे उपक्रम घेण्यास प्रोत्साहन दिले. 

पालकान मध्ये शिक्षणाच्या महत्त्वा विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यांनी नियमित अंतराने पालक- शिक्षकांच्या बैठका घेतल्या ज्या मुळे पालक आपल्या मुलांना नियमित पणे शाळेत पाठवतील.

1863 मध्ये, ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ नावाचे एक केअर सेंटर देखील सुरू केले, शक्यतो हे भारतातील पहिले भ्रूण हत्या प्रतिबंधक गृह आहे. 

गरोदर ब्राह्मण विधवा आणि बलात्कार पीडितांना त्यांच्या मुलांची सुरक्षित आणि सुरक्षित ठिकाणी प्रसूती करता यावी म्हणून याची स्थापना करण्यात आली होती.  त्या मुळे विधवांची हत्या रोखता येईल तसेच भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होईल. 

1874 मध्ये, ज्योतिराव आणि सावित्रीबाई, जे अन्यथा समस्याहीन होते, त्यांनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवे कडून एक मूल दत्तक घेतले आणि त्यामुळे समाजातील पुरोगामी लोकांना एक मजबूत संदेश दिला. यशवंतराव हा दत्तक मुलगा मोठा होऊन डॉक्टर झाला.


सावित्रीबाई फुले यांनी समाज प्रबोधनासाठी केलेले कार्य (Savitribai Phule for social awareness work):-


अस्पृश्यता आणि जाति व्यवस्थेचे निर्मूलन, खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आणि हिंदू कौटुंबिक जीवनात सुधारणा करण्यासाठी त्यांनी ज्योतिराव यांच्या प्रयत्नां मध्ये त्यांच्या सोबत काम केले. 

24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिरावांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘सत्यशोधक समाज’ या सामाजिक सुधारक समाजाशीही त्या संबंधित होत्या. 

मुस्लिम, ब्राह्मणेतर, ब्राह्मण आणि सरकारी अधिकारी सदस्य म्हणून समाविष्ट असलेल्या समाजाचा उद्देश - महिला, शूद्र, दलित असलेल्या लोकांना अत्याचार आणि शोषणा पासून मुक्त करणे हा होता. 

1876 पासून सुरू झालेल्या दुष्काळात सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी निर्भीड पणे काम केले. त्यांनी वेग वेगळ्या भागात मोफत अन्न वाटप केले.  

या सोबतच महाराष्ट्रात 52 स्थळांवर मोफत भोजन वसतिगृहे ही सुरू केली. 1897 च्या दुष्काळात सावित्रीबाईंनी ब्रिटिश सरकारला मदत कार्य सुरू करण्यास प्रवृत्त केले.

शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्याने ही जाती आणि लिंगभेदा विरुद्ध आवाज उठवला. काव्या फुले (1934) आणि बावन काशी सुबोध रत्नाकर (1982) हे त्यांच्या कवितांचे संकलन पुस्तक आहेत.

या जोडप्याने कोणताही पुजारी किंवा हुंडा न देता समाजात कमीत कमी खर्चात विवाह लावले. सावित्रीबाईंनी महिला विभागाच्या प्रमुख म्हणून काम केले आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी पतीच्या निधना नंतर त्या समाजाच्या अध्यक्षा झाल्या. 

सावित्रीबाईंनी आपल्या पतीचे कार्य समाजाच्या माध्यमातून शेवटच्या श्वासा पर्यंत पुढे नेले.


सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू (Death of Savitribai Phule):-

सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांचे दत्तक पुत्र यशवंतराव यांनी डॉक्टर म्हणून लोकांची सेवा केली. 1897 मध्ये बुबोनिक प्लेगच्या जगभरातील साथीने महाराष्ट्रा मधील आणि आजू बाजूच्या भागावर आर्थिक, सामाजिक, स्वास्थ वर वाईट परिणाम केला.  

तेव्हा धैर्यवान सावित्रीबाई आणि यशवंतरावांनी या रोगाने संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्याच्या बाहेर एक दवाखाना उघडला. सावित्रीबाई यांनी रूग्णांना क्लिनिक मध्ये आणले जेथे यशवंतरावांनी त्यांच्यावर उपचार करत आणि सावित्रीबाई त्यांची काळजी घेत. 

कालांतराने, रुग्णांची सेवा करत असताना सावित्राबाई हि आजारी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा मृत्यू झाला. 



Tuesday, 8 March 2022

जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती च्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती च्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
या निमित्ताने महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ नेहा कुलकर्णी, सचिव, श्रमिक संस्था मेढा उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ प्रमोद घाटगे होते
स्त्री पुरुष समानता या बाबत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सोबत संवाद साधत असताना प्रमुख मार्गदर्शिका मा. नेहा कुलकर्णी यांनी समाजात स्त्रीला मिळणार्‍या दुय्यमत्वावर नेमके बोट ठेवले. मालमत्ता अधिकार, निर्णय अधिकार,श्रमविभागणी, हिंसाचार, लैंगिकता अधिकार अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे त्यांनी कुटुंबात आणि पर्यायाने समाजात आजही असणारी स्त्री पुरुष विषमता अधोरेखित केली. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनात याबाबत जाणीव जागृती होऊन त्यांनी स्वतःपासून बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
           यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी सजग होऊन स्त्रीपुरूष भेद न करण्याचे आवाहन केले. आपल्या वैयक्तिक आयुष्यात महिलांना सक्षमतेची जाणीव होऊन त्यांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा आणि संधी मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वताचा आनंद हा केवळ स्वतःच्या मनात असतो तो मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. 
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या समन्वयक गायत्री जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ उदय पवार यांनी केले. 
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आज महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*https://star11maharashtra.com/maharashtra/612/

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान* ==============...