आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. व्ही. अशोक गिरी यांचे स्वागत

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. व्ही. अशोक गिरी यांचे स्वागत

मेढा/दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला याप्रसंगी प्रास्ताविक स्टाफ प्रतिनिधी डॉ. संजय धोंडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयाची वाढ व विकास कसा झाला हे सांगितले आणि महाविद्यालयाचा स्टाफ तरुण तडफदार आहे त्याचा नक्कीच महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयोग होईल याची ग्वाही दिली. नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी माहिती तंत्रज्ञान, वेबसाईट तसेच ऑफलाईन एज्युकेशन मध्ये सुधारणा करून खूप चांगल्या प्रकारे काम करता येईल असे सांगितले. त्यांचे स्वागत करताना महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. महेश देशमुख यांनी जयवंत प्रतिष्ठान च्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य केले जाईल आणि जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्यासाठी संस्थेकडून मदत केली जाईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.