Saturday, 21 October 2023

ASSM MEDHA: NAAC A GRADE

ASSM LIBRARY & KNOWLEDGE RESOURCES CENTRE GOT 100% MARKS. !!! From NAAC!!! JAY HO!!
 IT'S PROUDFUL THING FOR LIBRARY 

Thank you all Library Users

Happy Reading!!! 
Happy Learning!!!

From
Librarian
Dr.SR NAGARKAR

Wednesday, 18 October 2023

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी हा संदेश दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे  तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत  पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.
उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी  हा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी  ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

Monday, 2 October 2023

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.=========================मेढा 2 ऑक्टोबर 2023 - " थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.============

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.
=========================
मेढा 2 ऑक्टोबर 2023 - 
" थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि  त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले.
  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर  प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान  असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी  'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.
============

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान* ==============...