*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.=========================मेढा 2 ऑक्टोबर 2023 - " थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.============

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.
=========================
मेढा 2 ऑक्टोबर 2023 - 
" थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि  त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले.
  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर  प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान  असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी  'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.
============

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश