Posts

DR.N.B. KHOT मॅडम यांचा ग्रंथ गौरव समिती बाबत

ILA, MUCLA, SUCLA तसेच BBKKRC SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR सर्व टिचींग व नॉन टिचिंग स्टाफ, DLIS SUK  सर्व स्टाफ, विद्यार्थी व महाराष्ट्रातील सर्व ग्रंथपाल बंधू भगिनींना कळविण्यात येते की, आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. नमिता खोत डायरेक्टर BBKKRC, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमासंदर्भात  मिटिंग आयोजित करण्यात आली, त्यामध्ये ग्रंथ गौरव समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली तसेच INNOVATIVE BEST PRACTICES IN LIBRARY तसेच मी ग्रंथपाल कसा झालो  आणि डॉ. खोत मॅडम विषयी आलेले अनुभव  या  संदर्भात  ISBN सहित पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.  या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी  व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. तरी सर्वांना विनंती की, आपण  व्हाट्सअप ग्रुप लिंक चा वापर करून ग्रुप जॉईन करावा. व या ग्रुप वर पुढील कार्यवाही बाबत निवेदन अवाहन सूचना देण्यात येणार आहेत तसेच कुणाला सूचना करावयाच्या असतील तरी त्या पाठवता येतील. https://chat.whatsapp.com/IRL3sSEMg67Hpv2s0q8jyr

दैनिक सकाळ २१February २०२२

Image
ASSM LIBRARY MEDHA WEBSITE

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश

Image
विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे  नेट व सेट परीक्षेत यश मेढा /सातारा : विद्यानिकेतन सेट नेट गाईडन्स सेंटर, सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी कराड यांनी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले तसेच श्रीमती अश्विनी शिंदे पुणे आणि रूपाली पाटील कोल्हापूर यांनीही सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले. गायडन्स सेंटरचे समन्वयक प्रा. वंदना शिंदे तसेच प्रा.तेजस्विनी बाबर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  त्यांना  प्रा.अतुल नगरकर व डॉ.सुधीर नगरकर  ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या श्री सिद्धार्थ कुलकर्णी हे एम.ई.सी. बी.मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सर्वांना भविष्यकाळातील कार्यासाठी विद्यानिकेतन च्या सचिव डॉ. विद्याताई शेखर पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या.

assm library website

Assm Library Website Click here https://sites.google.com/site/assmlibrarymedha/home_1

शिवजयंती २०२२

Image
शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ दहा मावळे होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा. अफजलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमंलात आणला होता. माघार घेणे हे सुद्धा काहीवेळा आवश्यक असते. महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत त्यामुळे होणारे नुकसान टळत असे आणि नव्याने तयारी करण्याची संधीही मिळत असे. सहकारी चांगले निवडा. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती.  जय भवानी !जय शिवाजी !! शिवराय मनामनात!!  शिवजयंती घराघरात!! From Dr. Sudhir Nagarkar

खरे समाधान!!!!

Image