Skip to main content

शिवजयंती २०२२

शिवजयंती
शिवचरित्रातून काय शिकावे

सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ दहा मावळे होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच.

संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा. अफजलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमंलात आणला होता.

माघार घेणे हे सुद्धा काहीवेळा आवश्यक असते. महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत त्यामुळे होणारे नुकसान टळत असे आणि नव्याने तयारी करण्याची संधीही मिळत असे.

सहकारी चांगले निवडा. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे

सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती. 
जय भवानी !जय शिवाजी !!
शिवराय मनामनात!!
 शिवजयंती घराघरात!!
From
Dr. Sudhir Nagarkar

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बातमी

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे  नेट व सेट परीक्षेत यश मेढा /सातारा : विद्यानिकेतन सेट नेट गाईडन्स सेंटर, सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी कराड यांनी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले तसेच श्रीमती अश्विनी शिंदे पुणे आणि रूपाली पाटील कोल्हापूर यांनीही सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले. गायडन्स सेंटरचे समन्वयक प्रा. वंदना शिंदे तसेच प्रा.तेजस्विनी बाबर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  त्यांना  प्रा.अतुल नगरकर व डॉ.सुधीर नगरकर  ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या श्री सिद्धार्थ कुलकर्णी हे एम.ई.सी. बी.मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सर्वांना भविष्यकाळातील कार्यासाठी विद्यानिकेतन च्या सचिव डॉ. विद्याताई शेखर पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या.