अडीच अक्षर....

👌🏻👌🏻मराठीची कमाल बघा तर👌🏻👌🏻

अडीच अक्षरांचा कृष्ण
       अडीच अकरांची लक्ष्मी
अडीच अक्षरांची श्रद्धा
         अडीच अक्षरांची शक्ती!

अडीच अक्षरांची कान्ता
        अडीच अक्षरांची दुर्गा
अडीच अक्षरांची ईच्छा
          अडीच अक्षरांचा योद्धा!

अडीच अक्षरांचे ध्यान
         अडीच अक्षरांचा त्याग
अडीच अक्षरांचेच कर्म
          अडीच अक्षरांचाच धर्म!

अडीच अक्षरांत भाग्य
         अडीच अक्षरांत व्यथा
अडीच अक्षरांतच व्यर्थ
            बाकी सारे मिथ्या!

अडीच अक्षरांत सन्त
         अडीच अक्षरांचा ग्रंथ
अडीच अक्षरांचा मंत्र
         अडीच अक्षरांचे यंत्र!

अडीच अक्षरांची तुष्टी
          अडीच अक्षरांचीच वृत्ती
अडीच अक्षरांतच श्वास
          अडीच अक्षरांतच प्राण !

अडीच अक्षरांचा मृत्यू
         अडीच अक्षरांचाच जन्म
अडीच अक्षरांच्याच अस्थि
        अडीच अक्षरांचाच अग्नि !

अडीच अक्षरांचा ध्वनी
         अडीच अक्षरांचीच श्रुती
अडीच अक्षरांचा शब्द
            अडीच अक्षरांचाच अर्थ!

अडीच अक्षरांचा शत्रू
            अडीच अक्षरांचा मित्रं
अडीच अक्षरांचेच सत्य
          अडीच अक्षरांचेच वित्त!

जन्मापासून मृत्यूपर्यंत 
       अडीच अक्षरांत बाधंले
आयुष्य हे मानवाचे,
                नाही कुणा उमगले!
नाही कुणा उमगले!!

👎नाही कुणा समजले👎

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.