Friday, 11 July 2025

सकाळ बातमी

news

नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र उद्योजक सुशांत भिलारे | https://sp-news7.blogspot.com/2025/07/blog-post_11.html?m=1

Monday, 7 July 2025

*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र**उद्योजक श्री. सुशांत भिलारे*



*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र*
*उद्योजक श्री. सुशांत भिलारे*
विध्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष अटळ आहे आणि सातत्य पूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र आहे असे मत मा. श्री सुशांत भिलारे यांनी व्यक्त केले. ते
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "आजच्या युवकासमोरील आव्हाने आणि विविध संधी" या विषयावर विध्यर्थ्यांच्यासाठी आयोजित व्याख्यान आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात बोलत होते.
सदर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या जीवन प्रवास विध्यार्थीच्या समोर मांडला.
जावली सारख्या ग्रामीण भागातील युवक सुद्धा कसा यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून पटवून दिले.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्ध, चिकाटी आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे असे मत त्यानी व्यक्त केले.
 या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा डॉ प्रमोद घाटगे यांनी सुशांत भिलारे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच शिक्षणामुळे भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविदयालयचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी यांनी शिस्त, संयम, सातत्यपूर्ण प्रामाणिक संघर्ष आणि एकनिष्ठा किती महत्वाची आहे हे पटवून दिले. तसेच जावली तालुक्यातील उद्योजक यांनी तालुक्यातील विध्यार्थीना प्रेरणा देऊन त्यांचे उज्वल भविष्य यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. श्री शंकर देशमुख सर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा डॉ सारंगपाणी शिंदे यांनी केले आणि आभार प्रा डॉ संजय धोंडे यांनी मानले.
 सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  विविध अभ्यास क्रमाचे विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-* *सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*

*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-* 
*सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे सहकार संवर्धन आणि सहकारी चळवळीत युवकांचा सहभाग या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहकार निबंधक कार्यालय,मेढा येथील सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकार हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. दुर्बल घटकांचा आधार म्हणून सहकाराकडे पाहिले जाते.देशाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनात सहकारी संस्थांनी महत्वाचे योगदान दिले आहे. जागतिकीकरणानंतर सहकारी संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरीही ग्रामीण समाजातील अर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे हित जोपासण्याचे कार्य सहकारी संस्था पार पाडत आहेत. देशाचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणुनच युवकांनी सहकारी चळवळीच्या विकासासाठी आणि सहकाराचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊन समाजात सहकार विषयक जागृती निर्माण करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका सांगून विद्यार्थ्यानी सहकाराचे प्रशिक्षण घेऊन आपले नेतृत्व विकसित करावे आणि सामजिक परिवर्तनाबरोबरच सहकारी संस्थामधून उपलब्ध होत असलेल्या अनेक रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, सहकार तज्ञ श्री. वैभव शिंदे, श्री. अक्षय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत करण्यात आले.प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय धोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुजित कसबे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.डॉ. मृणालिनी वाईकर यांनी केले.महाविद्यालयातील शिक्षक आणि १२० विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले.

Saturday, 28 June 2025

*“अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न" - मा. न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड”*

*“अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न" - मा. न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड”*

मेढा/ दिनांक 26 जुलै 2025 रोजी, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. उच्च न्यायालय, मुंबई, ना.महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी  दिन साजरा करण्यात आला.मेढा येथील दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड, यांच्या मार्गदर्शनाखाली  सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर  डॉ.अशोक व्ही.गिरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तसेच मेढा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, जावली तालुका बार संघाचे अध्यक्ष ॲड. श्री.आर.एस.पोफळे, ॲड.श्रीमती.पी.डी गोरे, ॲड. श्रीमती.एन.एस. पवार,ॲड.श्री अनुप लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 याप्रसंगी बोलताना मा. डॉ.विक्रम आव्हाड यांनी सांगितले की,भारतात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ऍक्ट- १९८५(एनडीपीएस ) नुसार  नशीले पदार्थ वापरणे गुन्हा आहे. यासाठी होणारा  दंड अगर शिक्षा ही ड्रग्सचा  किती प्रमाणात वापर होतो त्यावर अवलंबून असते.युवा पिढीमध्ये  अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी करण्याचे प्रमाण वाढत आहे हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला असून युवकांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
  अध्यक्षीय मनोगतातून बोलताना प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी म्हणाले  की अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी ही बाब समाजाच्या  आणि एकंदर राष्ट्राच्या प्रगतीला मारक ठरत आहे. दिवसेंदिवस आपली युवा पिढी अमली पदार्थ सेवनाच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळत आहे.कोणत्याही  देशाच्या प्रगतीचा प्रमुख आधारस्तंभ युवक हाच असतो.म्हणून भावी पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजजागृती करणे ही युवा पिढीची जबाबदारी आहे.
 दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी याबाबत विद्यार्थी वर्गात जाणीव जागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने  या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या मार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी केले.प्रा.प्रकाश जवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा.सौ.गायत्री जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ बातमी