*भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!*
*:तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर*
==================
*मेढा -*
*७ नोव्हेंबर २०२५*
" बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्याआनंदमठ या कादंबरीत
वंदे मातरम हे गीत लिहिले त्यास आज १५० वर्षे पूर्ण झाली असून या गाण्यातील देशप्रेम व देशभक्ती आपण विसरून जाऊ नये हीच या कार्यक्रमामागील मुख्य प्रेरणा असून,भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!" असे मत
तहसीलदार मा. हणुमंत कोळेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्य कौशल्य,
रोजगार,उद्योजगता आणि नावीन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व वेण्णा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम सार्ध महोत्सव व वंदे मातरम गीत गायन कार्यक्रम येथील कलश मंगल कार्यालयात आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.त्याप्रसंगी मा. कोळेकर साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी मा.निलेश पाटील,प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी,मेढा आगार प्रमुख निता बाबर, वनरक्षक रोशनी मॅडम, प्राचार्य बी. बी.पाटील,
आदिनाथ ओंबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
७ नोव्हेंबर रोजी बकिंमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या " वंदे मातरम " या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वंदे मातरम या गाण्याचे सामूहिक गायन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुरुवातीस प्राचार्य मेजर डॉ अशोक व्ही.गिरी, तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने, प्राचार्या सौ. अश्विनी शिंदे व प्रा.शेख सर यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
त्यानंतर ९. ५० वाजता " वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.यासाठी वेण्णा विद्या मंदिर व ज्यु. कॉलेज,आय. टी. आय,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी - विध्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा.मयूर धारक यांचे " वंदे मातरम " या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी बकिंमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताचा इतिहास व अर्थ सांगितला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेढा येथील प्रभारी प्राचार्य सौ.अश्विनी शिंदे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.आनंद साठे व बळवंत पाडळे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात वेण्णा विद्या मंदिरच्या विध्यार्थी कलाकारांनी " वंदे मातरम " या विषयावर सुंदर लघुनाटिका सादर करून रासिकांची मने जिंकली.या कार्यक्रमास मेढा शहरातील विविध शासकीय - निमशासकीय कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,वेण्णा विद्या मंदिर व ज्यु.कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
तसेच सामाजिक, कला,साहित्य क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी खूपच परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी आय. टी. आय. चे स्टोअर किपर श्री. इंदलकर यांनी आभार मानले.....

