Monday, 8 December 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.•••••••••••••••••••••••••••••••“

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “
प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.
•••••••••••••••••••••••••••••••

“ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शिक्षण, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांवर आधारित होते, ज्यात 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ' ही त्यांची मुख्य शिकवण होती.त्यांनी जातिभेद निर्मूलन, महिला सक्षमीकरण,कामगार हक्क आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “ असे मत प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर पुढे म्हणाले,"डॉ.आंबेडकर यांचे विचार गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होते, ज्यात शिक्षणाला वाघिणीचे दूध मानले गेले आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यावर भर दिला गेला. त्यांच्यामते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,असे ते म्हणाले. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत असावा यावर त्यांचा भर होता.जाती-आधारित भेदभावामुळे दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि सामाजिक न्यायाची मागणी केली.त्यांनी लोकांना संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले, याशिवाय त्यांनी देशातील सर्वच स्त्रियांच्या हक्कांसाठी  अथक प्रयत्न केले, त्यांचे शिक्षण आणि सामाजिक स्थान उंचावण्यासाठी त्यांनी कार्य केले.ते गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना आपले गुरु मानत होते.या महामानवांचा विचार प्रमाण मानला. ते स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी न्याय, समता आणि बंधुतेवर आधारित लोकशाहीची स्थापना केली.असे सांगून प्राचार्य डॉ. अशोक गिरी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या बुद्धिमत्तेचा विकास केला आणि देशातील दिन- दलित,आदिवासी, स्त्रिया व सर्व भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय हे मूलभूत अधिकार व हक्क बहाल केले. “ कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.गायत्री जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
================

Saturday, 8 November 2025

*भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!**:तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर*==================*

*भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!*

*:तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर*


==================
*मेढा -*
*७ नोव्हेंबर २०२५*

" बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्याआनंदमठ या कादंबरीत
वंदे मातरम हे गीत लिहिले त्यास आज १५० वर्षे पूर्ण झाली असून या गाण्यातील देशप्रेम व देशभक्ती आपण विसरून जाऊ नये हीच या कार्यक्रमामागील मुख्य प्रेरणा असून,भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!" असे मत 
तहसीलदार मा. हणुमंत कोळेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्य कौशल्य,
रोजगार,उद्योजगता आणि नावीन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व वेण्णा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम सार्ध महोत्सव व वंदे मातरम गीत गायन कार्यक्रम येथील कलश मंगल कार्यालयात आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.त्याप्रसंगी मा. कोळेकर साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी मा.निलेश पाटील,प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी,मेढा आगार प्रमुख निता बाबर, वनरक्षक रोशनी मॅडम, प्राचार्य बी. बी.पाटील,
आदिनाथ ओंबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
७ नोव्हेंबर रोजी बकिंमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या " वंदे मातरम " या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वंदे मातरम या गाण्याचे सामूहिक गायन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुरुवातीस प्राचार्य मेजर डॉ अशोक व्ही.गिरी, तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने, प्राचार्या सौ. अश्विनी शिंदे व प्रा.शेख सर यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
त्यानंतर ९. ५० वाजता " वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.यासाठी वेण्णा विद्या मंदिर व ज्यु. कॉलेज,आय. टी. आय,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी - विध्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा.मयूर धारक यांचे " वंदे मातरम " या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी बकिंमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताचा इतिहास व अर्थ सांगितला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेढा येथील प्रभारी प्राचार्य सौ.अश्विनी शिंदे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.आनंद साठे व बळवंत पाडळे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात वेण्णा विद्या मंदिरच्या विध्यार्थी कलाकारांनी " वंदे मातरम " या विषयावर सुंदर लघुनाटिका सादर करून रासिकांची मने जिंकली.या कार्यक्रमास मेढा शहरातील विविध शासकीय - निमशासकीय कार्यालयाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,वेण्णा विद्या मंदिर व ज्यु.कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 
तसेच सामाजिक, कला,साहित्य क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी खूपच परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी आय. टी. आय. चे स्टोअर किपर श्री. इंदलकर यांनी आभार मानले.....

Wednesday, 29 October 2025

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा !!

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

मेढा/ दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी सर होते त्यांनी आपल्या मनोगतात डॉ.एस.आर. रंगनाथन याचा जन्मदिन हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो तसेच सर्वांनी जास्तीत जास्त ग्रंथालयाचा वापर केला पाहिजे, सर्व वाचकांनी ग्रंथालय वेबसाईट चा वापर करून त्या ठिकाणी असणारे इ-स्त्रोत जास्तीत जास्त वाचले पाहिजेत. स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त ऑडीओ बुक्स सुद्धा एकली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी सर्वगुण संपन्न होण्यासाठी ग्रंथालयाचा वापर करून आपली ज्ञान वृद्धी केली पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रमुख उपस्थिती डॉ. प्रमोद घाटगे सर यांनी महाविद्यालयाचा विकासात ग्रंथालयाचा अनमोल वाटा आहे असे उद्बोधन केले सर्व ग्रंथालय कर्मचार्यांना शुबेछ्या दिल्या. 
या प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तसेच महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वकृत्त्व स्पर्धेसाठी शुभेछ्या दिल्या. सूत्रसंचालन संख्याशास्त्र विभाग प्रमुख शुभांगी पाटील यांनी केले तसेच प्रा.बापू पाटील यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. प्रमोद चव्हाण तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय धोंडे व डॉ. संजय भोसले आणि प्रा. संतोष कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ ५० विध्यार्थ्यानी घेतला.

Sunday, 19 October 2025

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न **

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न ** आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील जिमखाना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे तसेच महाविद्यालयीन युवतींमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी सांगीतले. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथील ब्लड बँक आणि ग्रामीण रुग्णालय मेढा येथील रेड रिबन क्लब यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदानाचे आपले पवित्र कर्तव्य बजावले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी आपली हिमोग्लोबिन तपासणी करून घेतली.या समाजसेवी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभागाचे डॉ. प्रमोद चव्हाण, एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे, डॉ.विनोद पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व सदस्य, स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Friday, 17 October 2025

*वैविध्यपूर्ण वाचनातून स्वतःचा विकास झाल्यास समाज आणि देशाचा विकास निश्चितच होतो.*:*प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी*

*वैविध्यपूर्ण वाचनातून स्वतःचा विकास झाल्यास समाज आणि देशाचा विकास निश्चितच होतो.*
:*प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी*
मेढा, ता. जावळी, जि. सातारा – जयवंत प्रतिष्ठान, हुमगाव यांच्या संचालनाखाली आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्र, NSS विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन २०२५ यशस्वीरित्या संपन्न झाला.
दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजता आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ. सुधीर रामदास नगरकर यांनी सांगितले की वाचन ही केवळ सवय नसून संस्कार आहे; नियमित वाचन व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधते.
या कार्यशाळेत सौ. गायत्री जाधव यांनी “भारतीय संविधान : उद्देशिका, अधिकार व कर्तव्य” या विषयावर वर्णनात्मक प्रकट वाचन सादर केले. त्यांनी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडली. उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि वाचनातून प्रेरणा मिळवली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, संविधानाचे महत्त्व आणि नागरिक म्हणून भूमिकेबाबत स्पष्ट समज विकसित झाला.
मुख्य पाहुणे डॉ. प्रमोद घाटगे यांनी वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, विचारशक्ती आणि मूल्यनिष्ठ शिक्षण यांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “वाचाल तर वाचाल” असे सांगितले व डिजिटल युगात सोशल मीडियाच्या जलद माहितीत अडकून न पडता संदर्भग्रंथ व चिंतनशील साहित्य वाचण्याचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी सांगितले की, “आपण सर्वजण दैनंदिन जीवनात वाचन करतो, पण काय वाचावे आणि काय वाचू नये हे ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन करण्याचे आवाहन केले आणि पुढे सांगितले की, “स्वतःचा विकास झाला तरच समाज आणि देशाचा विकास होतो.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एस. व्ही. धोंडे (NSS विभागप्रमुख) यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवरांचे, आयोजक विभागांचे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद साठे यांनी केले. त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाचे सर्व टप्पे उत्तम रीतीने पुढे नेले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ग्रंथालय परिचारक श्री. वसंत धनावडे, श्री. आबासाहेब देशमुख, श्री. अविनाश मदने यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढली, विचारशक्ती मजबूत झाली आणि संविधानिक शिक्षणाची जाणीव निर्माण झाली, असे आयोजकांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचा पुढाकर*

*पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचा पुढाकर* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सोलापूर आणि मराठवाडा जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने केलेल्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य,कपडे, किराणा वस्तू, खाद्यपदार्थ, शालेय साहित्य, इत्यादी  वस्तू स्वरूपातील मदत महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही .गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संकलित करण्यात आली. याबरोबरच सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी जमा केलेली मदत संकलित करण्याचे प्रमुख केंद्र म्हणूनही पुढाकर घेऊन महाविद्यालयाने यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. सदर जमा केलेली वस्तू रुपातील मदत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षामध्ये जमा करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाने जोपासलेल्या  या सामाजिक बांधिलकीबद्दल  संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे ,सचिव वैशाली शिंदे यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक करून  विषेश आभार मानले. प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे, डॉ.विनोद पवार, तसेच सर्व एन.एस.एस. समिती सदस्य, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी  मदत संकलित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.•••••••••••••••••••••••••••••••“

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “ प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी. •••••••••...