Dr. नमिता खोत ग्रंथ गौरव प्रकाशन सोहळा 5जून २०२२

संपादकीय मनोगत 
आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच सर्व स्नेही यांना मी मुख्य संपादक डॉ. सुधीर नगरकर नमस्कार करतो व सर्वाचे स्वागत करतो. आदरणीय
डॉ. नमिता खोत मॅडम दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असताना या प्रसंगी अनेकांच्या मना मध्ये एका चांगल्या ग्रंथाचे प्रकाशन व्हावे अशी भावना आनेक ग्रंथालय प्रोफेशनलस नि मॅडम कडे व्यक्त केली. मॅडम नि त्याच्यावर विचार 
केल्या नंतर आम्हा सर्वाना हे काम तेवढे सोपे नाही, जेवढे तुम्ही समजता आहात असे सांगितले. या गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश खांडेकर आणि गौरव समितीचे सर्व सदस्य तसेच आज प्रकाशित होणार्‍या गौरव ग्रंथाचे सर्व संपादक व सहसंपादक मंडळ या सर्वांनी ठरविले की जरी हे अवघड असले तरी अशक्य नाही त्यामुळे गौरव ग्रंथ प्रकाशन करावयाचे ठरले आणि यासाठी विषय ठरविण्यात आला तो म्हणजे “ग्रंथपालनातील सर्वोत्तम नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्रंथालयीन सेवा” म्हणजेच “Innovative Best Practices and Library Services in Librarianship” 
 या गौरव ग्रंथाचे दोन भागात विभाजन करण्याचे ठरले. पहिला भाग ग्रंथपालनातील सर्वोत्तम नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्रंथालयीन सेवा आणि त्याचे उपविषय दुसरा भाग हा आदरणीय डॉ.नमिता खोत मॅडम यांच्या विषयीच्या आठवणी असे ठरविण्यात आले.
जेव्हा प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला, तेव्हा आम्हा संपादक मंडळाच्या मना मध्ये, आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल का ? असे प्रश्न उठू लागले. आणि एक प्रयत्न म्हणून डॉ.नमिता खोत ग्रंथ गौरव समिती असा WhatsApp ग्रुप तयार केला. आश्चर्य म्हणजे एक दिवसाच्या आत हा फूल्ल झाल्यामुळे दुसरा ग्रुप बनविण्यात आला. या गौरव ग्रंथासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून १०० पेक्षा जास्त लेख पाठवून डॉ. नमिता खोत गौरव ग्रंथ प्रकाशन प्रीत्यर्थ उदंड प्रतिसाद मिळाला. 
या मध्ये Innovative Best Practices चे 19 लेख Innovative Library Services adopted in Pandemic चे 8 लेख , How you started career as Library Professional चे 5 लेख Library Case Studies चे 31 लेख आणि डॉ. नमिता खोत मॅडम यांचा विषयीच्या आठवणींचे 40 लेख असे एकूण 103 लेख प्रकाशित करण्यात आले. या ग्रंथाचे प्रकाशन प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी केलेले आहे.
मॅडमच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रकाशित होणाऱ्या या गौरवग्रंथास सहकार्य करणारे गौरवग्रंथ समिती सदस्य, मित्रमंडळ, हितचिंतक, विद्यार्थी, आप्तेष्ट, तसेच प्रशांत पब्लिकेशन जळगाव मुद्रक-प्रिंटर्स यांचा मी अत्यंत आभारी आहे, सदरचा ग्रंथ आपणांसारख्या रसिक वाचकांच्या हाती देताना आत्यंतिक मानसिक समाधान लाभले तेच आपणा सर्वांना लाभो हीच सदिच्छा. तसेच सदर पुस्तक हे ग्रंथालयशास्त्रामध्ये नवीन करिअर करणाऱ्यांना, ग्रंथपाल म्हणून कार्यरत असणाऱ्यांना, ग्रंथालयशास्त्रामध्ये संशोधन करणार्‍यांना व सर्व ग्रंथालय प्रोफेशनल्स यांना दिशादर्शक व मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणारे आहे.
ग्रंथालय हे संचित आहे, विचार विश्वाचे…
 शब्दांची रत्ने भरुनी राहिले, भांडार शारदेचे…
     
आदरणीय खोत मॅडम यांनी मला या ग्रंथासाठी मुख्य संपादक म्हणून काम करण्याची व संयोजकांनी मला माझे संपादकीय मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मॅडमचा व संयोजकांचा मनापासून आभारी आहे.
https://youtu.be/k1cE7CAi5Fo

                           ************

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.