संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य

संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य!

प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी.
=====================
" जगभरात आठ मार्च या दिवशी महिलांच्या कार्याचा,त्यांच्या विचारांचा,त्यांच्या शक्तीचा ,आणि त्यांच्या अस्मितेचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचाच गौरव केला जातो.असे असताना आपले महाविद्यालय ज्या मातीवर उभे आहे त्याच जावळीच्या मातीत रुजून फुलून इतरांना फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करणे महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी असून त्याच बांधिलकीला जपताना आज हा सत्कार समारंभ साजरा करत
आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.संघर्षातून स्वतःला सिद्ध करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करणे आपले कर्तव्य!"
असे मत प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन व या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त करताना वरील विचार मांडले.
विचारमंचावर जावली तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा महिला उपस्थित होत्या.
    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना मा. प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी पुढे म्हणाले " आजच्या जगात महिलांनी स्वसंरक्षणासाठी कटिबद्ध असण्याची आवश्यकता आहे.इथून पुढील आयुष्यात विद्यार्थिनिंनी कठीणप्रसंग आल्यास घाबरून न जाता त्याला धैर्याने तोंड द्यावेआपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक गिरी यांनी जावलीसारख्या दुर्गम,ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यामागील संकल्पना स्पष्ट करून,
उपस्थित विद्यार्थिनींना कर्तृत्ववान महिलांच्या व्यक्तीमत्वातून भावी आयुष्यात समाजात काहीतरी सकारात्मक कार्य आपल्या हातून घडण्याची प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य, उपप्रचार्य व कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील विध्यार्थी व विध्यार्थिनींनी स्त्री मुक्तीची गाणी गायली व कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर जावली तालुक्यातील विविध क्षेत्रात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कामाने ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.यामध्ये मा.जयश्री शेलार (हिरकणी फौंडेशन ,सामाजिक क्षेत्र),मा.सुनिता पार्टे (सामाजिक क्षेत्र),मा.डॉ.ज्योती इंगळे (वैद्यकीय क्षेत्र),मा.राजश्री कदम (शैक्षणिक क्षेत्र),मा.मानसी संकपाळ (शासकीय क्षेत्र),मा.दिपाली गिरी (व्यावसायिक क्षेत्र),मा.विधिज्ञ.आरती शेटे (विधीसेवा क्षेत्र),मा.विधिज्ञ.पूनम कुंभार (सांस्कृतिक क्षेत्र),मा.सुकन्या जुनघरे (व्यावसायिक क्षेत्र),मा.माधवी चिकणे (शासकीय क्षेत्र),मा. सीमा पवार (आदर्श माता)या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
सत्काराला उत्तर देत असताना उपस्थित सत्कारमूर्ती कर्तृत्ववान महिलांनी आपला शून्यातून विश्व उभारण्याचा खडतर जीवनप्रवास,
त्यांची संघर्षाची वाटचाल उपस्थितांच्या समोर मांडली.अतिशय हृद्य असे मनोगत यावेळी प्रत्येकीने व्यक्त केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळच्या सत्रात,विद्यार्थीनिंसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून मा.श्री.अविनाश गोंधळी ,अध्यक्ष रेनबुकान कराटे दो असोसिएशन ,महाराष्ट्र हे उपस्थित होते.त्यांनी विध्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रा.गायत्री जाधव यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.शेवटी प्रा.धनश्री देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.