जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश —---------------------- मेढा: दिनांक ९ मार्च २०२४ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील बी. एस्सी. भाग १ ची विद्यार्थिनी कु. वैभवी भरत सुर्वे हिने विभागून तृतीय क्रमांक मिळवला. तिने ‘जल हेच जीवन’ या विषयावर तिचे मत अतिशय उत्कृष्ट मांडणी केली.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धा ही निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि लघुपट निर्मिती अश्या प्रकारांमध्ये कनिष्ठ व आणि वरिष्ठ गटांमध्ये घेण्यात आली.कु.वैभवी सुर्वे हिच्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी, उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले. सुर्वे हिला रोख रक्कम,प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले.महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे, प्रा.डॉ. ओमकार यादव व प्रा. रोहिणी खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले.कु.वैभवी सुर्वे हिला रोख रक्कम,प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.