*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

*स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणास्त्रोतातून युवकांनी ध्येयप्राप्ती करावी: प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी*

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विशेष व्याख्यान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक डॉ. संग्राम शिंदे हे होते त्यांनी असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र हे आहे. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. लहानपणापासूनच त्यांनी व्यायाम खेळ अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. ते पाश्चात्य गुढवादाने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. याशिवाय स्वामी विवेकानंद यांच्या विविध घटनांची माहिती दिली तसेच राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या संकल्पक असून त्यांनी स्वराज्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावून कुटुंबाबरोबर स्वराज्याची जबाबदारी निष्ठेने सांभाळली.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत आपले विचार मांडून वैदिक धर्माला जागतिक धर्म परिषदेत अधिष्ठान मिळवून दिले. याप्रमाणेच त्यांनी उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. या संदेशातून प्रेरणा घेऊन युवकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करून आपलं वेगळे अस्तित्व निर्माण करावे म्हणजे देशाचाही नावलौकिक वाढण्यास मदत होईल तसेच राजमाता जिजाऊ यांनी देखील प्राप्त परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकीचा विचार न करता स्वराज्याची निर्मिती करून रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. त्यामुळे स्वराज्य हे आपले आहे याची जाणीव होऊन अनेक मावळ्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपले प्राण दिले. अशा या थोर महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करुन आपले ध्येय प्राप्त करावे
 या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सातारा च्या संचालिका सौ. दिपाली देशमुख, श्री मयूर देशमुख आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे शिक्षक, 30 विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या इन्स्टिट्यूट च्या सहकार्याने महाविद्यालयातील 120 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.
 प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय भोसले यांनी केले तर आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा. शंकर गेजगे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.