**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*मेढा . .

**तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*

मेढा . दि . ४ , धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर सोनगाव या ठिकाणी जावली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा यशस्वी रित्या पार पडल्या.
शिक्षण विभाग -पंचायत समिती जावली मेढा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्पर्धेत आ . शशिकांत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयने तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला .
   तृतीय क्रमांक इयत्ता १२ वी सायन्स मधील विद्यार्थी वेदांत जगताप व क्रिश माने यांनी होलोग्राम ( थ्रिडी इमेज ) हा प्रकल्प तयार केला होता त्यांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर उत्तेजनार्थ क्रमांक रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पाला मिळाला . इयत्ता ११वी च्या साहिल ससाणे व मंथन जगताप यांनी हा प्रकल्प तयार केला होता .
सदर विद्यार्थ्यांना विज्ञान विभागाच्या श्रीमती प्रा .ज्योती कदम यांनी मार्गदर्शन केले .
 गटविकास अधिकारी श्री रमेश काळे व गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना तोडरमल व शिक्षण विस्तार अधिकारी श्री . चंद्रकांत कर्णे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉपी देऊन विद्यार्थांना गौरविण्यात आले .
विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी यांनी व उपप्राचार्य डॉ प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले .

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.