सेवागिरी युवा महोत्सवातमेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक...

सेवागिरी युवा महोत्सवात
मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या दोन्ही संघाचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक...
=================
मेढा -
प. पू. सेवागिरी महाराज पुसेगाव,यांच्या अमृतमहोत्सवी
यात्रानिमित्त,श्री सेवागिरी ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेला नववा जिल्हास्तरीय युवा महोत्सव नुकताच उत्सवात पार पडला.या महोत्सवात घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत, येथील जयवंत प्रतिष्ठान आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या,विध्यार्थी कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यांचे विभागून द्वितीय क्रमांक आले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल दोन्ही विजेत्या संघांना रोख रक्कम,चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विध्यार्थी कलाकारांनी तसेच जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संघाने,मिळवलेल्या या यशाबद्दल,संस्थेचे अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशालीताई शिंदे,सर्व विश्वस्त आणि महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी दोन्ही संघांचे,
अभिनंदन व कौतुक केले.सदर विद्यार्थी कलाकारांना डॉ.ओमकार यादव, प्रा.पी.डी.पाटील,
प्रा.धनश्री देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.