*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या . स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

*जिल्हास्तरीय शालेय क्रिडा बॉक्सिंग स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे जू . कॉलेजचे यश*

सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात *पार्थ रमेश शिंगटे* याने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .आज १० ऑक्टोबर रोजी झालेल्या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी सुरळीत पार पडल्या .
 स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री . जाधव टी .ए .व शारीरिक शिक्षक संचालक प्रा . प्रमोद चव्हाण हे होते .सदर विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी अभिनंदन केले व त्यांना विभागीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.