आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न
=================
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत
शिंदे महाविद्यालय मेढा येथे, भारताचा 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे व उद्योजक मा. संजय जुनघरे उपस्थित होते.
ध्वजारोहण,राष्ट्रगीत,ध्वजगीत व ध्वजवदंन झाल्यानंतर प्राचार्य डॉ.अशोक गिरी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की,
" विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशास अर्पण केली व आजच्या दिनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी,या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. तो दिन म्हणजे हा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करत आहोत. संविधानाने आपल्याला समान हक्क दिले आहेत.
आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता,समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी " असा मौलिक संदेश दिला.
त्याचबरोबर महाविद्यालयाच्या मागील कारकिर्दीचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले,
" संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टी व कार्यकुशलतेमुळे विस वर्षांपूर्वी हे महाविद्यालय स्थापन झाले. आपल्या जावळी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकरी,शेतमजूर व माथाडी कामगार यांच्या मुला - मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आज त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.इथून पुढेही यशाची ही चढती कमान अशीच सुरु ठेवून,आपण सर्वांनीच आमदार साहेबांच्या स्वप्न व ध्येयपूर्तीसाठी आपण सर्वांनी शैक्षणिक, क्रीडा व कला क्षेत्रात यश संपादन करून आपल्या महाविद्यालाचा नावलौकिक वाढवावा " असे आवाहन करून त्यांनी प्रजासत्ताकदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रध्वजास सर्व उपस्थितांनी मानवंदना दिली. तसेच विध्यार्थीनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले.यावेळी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विध्यार्थ्यांकडून मतदार जागृतीची प्रतिज्ञा वदवून घेण्यात आली.प्रा.गायत्री जाधव यांनी प्रतिज्ञा वाचन केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.अमेय देसाई यांनी,त्यांच्या आई कै.प्रा.शकुंतला आत्माराम देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाविद्यालयातील पन्नास हुशार व गरीब विध्यार्थी-विध्यार्थिनींना दरवर्षी मोफत एस. टी.पास.शिष्यवृत्ती घोषित केली व प्रतिनिधिक स्वरूपात,
कु.प्रिया गोळे व कु. अक्षदा जाधव या दोन विध्यार्थिनींना,
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
Comments
Post a Comment