Saturday, 21 October 2023

ASSM MEDHA: NAAC A GRADE

ASSM LIBRARY & KNOWLEDGE RESOURCES CENTRE GOT 100% MARKS. !!! From NAAC!!! JAY HO!!
 IT'S PROUDFUL THING FOR LIBRARY 

Thank you all Library Users

Happy Reading!!! 
Happy Learning!!!

From
Librarian
Dr.SR NAGARKAR

Wednesday, 18 October 2023

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी हा संदेश दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

" *आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही* "
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
" आजच्या युगात ज्ञानाला खूप महत्व आहे,हे ज्ञान गुरुबरोबरच ग्रंथसंपदेत भरून उरले आहे.आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय तरणोपाय नाही. " असे मत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आज ज्या महान व्यक्तीची जयंती आज आपण साजरी करत आहोत,त्यांना लहानपनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनामध्ये शिक्षणाच्या परिस्पर्श झाल्यामुळे  तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासाच्या व्यासंगातून शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत  पोहचले तसेच मेहनत व प्रामाणिकपणा अंगीकारून यशस्वी झेप घेतली.म्हणूनच ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करायची असेल तर, ग्रंथवाचन करून ज्ञान,मनन,चिंतन करून ज्ञान संकलन करावे व अशा महापुरुषांचे अनुकरण विध्यार्थ्यानी करावे आणि आपले भविष्य उज्वल घडवावे " असे आवाहन केले.
उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून आपली वाचन सवयी जोपासावी  हा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी  ग्रंथालयातील नियतकालिकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडून करंट कंटेंट सर्विस सुरू करण्यात आली. याचा लाभ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमासाठी विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी प्रा.राजेंद्र ननावरे यांनी आभार मानले.

Monday, 2 October 2023

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.=========================मेढा 2 ऑक्टोबर 2023 - " थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.============

*थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा युवापिढीने पुढे चालवावा*."
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी*.
=========================
मेढा 2 ऑक्टोबर 2023 - 
" थोर व्यक्तींच्या विचारांची युवा पिढीने जपणूक करून, देश विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे आणि  त्यांच्या विचारांचा वारसा आता युवा पिढीने पुढे चालवावा तीच खरी या महामानवांना खरी आदरांजली ठरेल " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी यांनी केले.
  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची उपस्थिती होती.ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की," महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात खडतर  प्रवास सहन करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना दक्षिण आफ्रिकेत ते रेल्वे मध्ये बसले असता,वर्णभेद मानणाऱ्या गोऱ्या लोकांनी रेल्वेमधून ढकलून दिले होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये वर्णभेद निर्मूलन झाले पाहिजे असा विचार आला.या उद्देशाने त्यांनी साऊथ आफ्रिकेत राहून,काळा गोराभेदाच्या विरोधात उठाव केला.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता,देश स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली व देशातील जनतेला जागृत करून,देश स्वतंत्र होईपर्यंत,ते अहिंसा,सत्य व शांततेच्या मार्गाने लढत राहिले.म्हणूनच आपला देश स्वतंत्र झाला. याच स्वतंत्र भारताचे तृतीय भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान  असे व्यक्तिमत्व होते . शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच भारताचा विकास हा भारतातील शेतीच्या विकासावरती आधारित आहे व भारत देशातील युवकांवर ते आधारलेला भारत देश आहे म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी  'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आणि त्यांनी शेतकरी, जवान व भारतीय जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले.या दोन्ही महापुरुषांचे योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही "असे सांगून, राष्ट्रपिता महात्मा गांधी वं पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनातील मौल्यवान आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार तर आभार डॉ. संजय भोसले यांनी मानले.
============

Friday, 29 September 2023

NET/SET

*UGC NET/SET PAPER 2 Library & Information Science* 
*SUBSCRIBE YOUTUBE CHANNEL FOR MORE UPDATES* 

*LIBRARY AND INFORMATION SCIENCE*

*UNIT-1*
https://youtu.be/mlNwwJFF_AE

*UNIT-2*
https://youtu.be/5njQMtSiJWo

*UNIT-3*
https://youtu.be/jkNMpZIs3gU

*UNIT-4*
https://youtu.be/XbpXHBstXqM

*UNIT-5*
https://youtu.be/a0hiiSu7P1g

*UNIT -6*
https://youtu.be/-69T_L8MkHU

*UNIT-7*
https://youtu.be/uPqVvU2RMvQ

*UNIT-8*
https://youtu.be/tL4z9OTnmKM

*UNIT-9*
https://youtu.be/dAt8IH4N06s

*UNIT-10*
https://www.youtube.com/live/X5RQxSPotyM?feature=share

*मी सेट होणारच!!! WEBSITE URL*
https://sites.google.com/site/assmlibrarymedha/netset-guidance?authuser=0

*NET/SET PAPER 1 ALL UNITS URL*

https://www.youtube.com/live/JUvUUyHtkTo?feature=share

सर्वांनी युट्युब वरील युनिट नंबर एक ते दहा पुन्हा पुन्हा पाहायचे आहेत. कारण तो सिल्याबस नुसार कंटेंट अतिशय महत्त्वाचा आहे. आपणास न येणाऱ्या गोष्टी वन पेज नोट्स काढायच्या आहेत नक्कीच यश तुम्हाला मिळेल!!!

Dr.SRN

Friday, 22 September 2023

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*==========================मेढा :

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*
==========================
मेढा :22/9/2023
" महाविद्यालयाच्या जडण घडणीत माजी विद्यार्थी मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची असून,माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण या विध्यार्थ्यांचे योगदान हे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अंत्यत महत्वाचे असते " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांनी केले.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थी मंडळाच्या वतीने, महाविद्यालयात विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.त्या प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक गिरी आपल्या अध्यक्षीय भाषणावेळी बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.गिरी सर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, " महाविद्यालयातून विशेष प्राविण्य प्राप्त करून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या,तसेच उच्च पदावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यानी, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करावे आणि आपल्या महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा "असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सदर मेळाव्यास संबोधित करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात  राबविले जात असलेले विविध उपक्रम आणि उपलब्ध भौतिक सुविधा याबाबात माहिती दिली. नजिकच्या काळात महाविद्यालयाचे नॅक समिती  कडून मूल्यांकन होणार असल्याने   माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध रुपात आपले विशेष योगदान द्यावे असे यावेळी आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा व त्यांच्याकडील विविध कौशल्यांचा  फायदा भावी पिढीतील विध्यार्थ्यांना व्हावा, तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण विकासामध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळावे या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यामध्ये नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांनी नॅक मूल्यांकनला माजी विध्यार्थी मंडळ सदस्यांनी कसे सामोरे जावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष ॲड. श्री.अनुप लकडे, उपाध्यक्ष श्री. सुर्यकांत पवार, सलीम डांगे, शुभम लोखंडे,प्रशांत लिंगडे या विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ. संजय धोंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. आनंद साठे यांनी सूत्रसंचालन केले.  मेळाव्यास ५० हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी प्रा.शंकर गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.