आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "भ्रष्टाचार मुक्त भारत- विकसित" भारत या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धा संपन्न.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "भ्रष्टाचार मुक्त भारत- विकसित" भारत या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धा संपन्न.*

बुधवार, दिनांक 9/11/2022 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखेच्या वतीने कॉमर्स विभागामार्फत" भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत " या विषयावर भित्ती पत्रिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर 
 स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.अमेय देसाई व प्रा.डॉ.संग्रामसिंह नलवडे उपस्थित होते.या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखेचे शाखा प्रमुख श्री.अविनाश सुतार यांनी स्पर्धेचे महत्व विषद करून,यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विकसित भारत घडविण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानात सहभागी होऊन समाजात जाणिव जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. सहभागी या स्पर्धेत कॉमर्स विभागातील ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत अनुक्रमे कु. साक्षी चिकणे, कु.कीर्ती वेंदे व कु. प्रणाली सकपाळ यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ. सुजित कसबे व प्रा. सौ गायत्री जाधव यांनी काम केले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.